हाथ छुटे भी तो रिश्ते नही छुटा करते,
वक्त की शाख से लम्हे नही टुटा करते!
पुरियाधनाश्रीचे बेचैन स्वर! 'वक्त की शाख से लम्हे..' या ओळीतील 'लम्हे'वर कोमल धैवत विसावतो, उदास सायंकालच्या सावल्या लांबतात आणि ते 'लम्हे' काळजात घर करतात..!
जिसने पैरों के निशा भी नही छोडे पिछे,उस मुसाफिर का पता भी नही पुछा करते..!
क्या केहेने..! बहुतही बढिया लिखा है. या ओळीचं चित्रिकरण तर विशेष सुरेख आहे! (इथे पाहता येईल)
'छुट गये यार ना छुटी यारी मौला..' चा कोरस सुंदर. कोरसचं सरगम गायनही अगदी परिणामकारक. गाण्याच्या चित्रिकरणातील उर्मिला अभिनयात, दिसण्यात नेहमीप्रमाणेच लाजवाब!
जगजित सिंग सारख्या अत्यंत सुरेल, तरल, ओल्या गळ्याच्या धनीने या गाण्याचं सोनं केलं नसतं तरच नवल होतं! हे गाणं ऐकलं की काव्य, संगीत आणि गायन या सर्वार्थाने एक अत्यंत उच्च दर्जाचं गाणं ऐकल्याचं समाधान मिळतं, जीव तृप्त होतो!
-- तात्या अभ्यंकर.
मिसळपाव डॉट कॉम या संकेतस्थळाचे मुखपृष्ठ म्हणून आज हा लेख प्रसिद्ध झाला आहे!



0 comments:
Post a Comment