January 22, 2015

गरम वडापाव..

अधूनमधून फोरासरोडला चक्कर मारलेली बरी असते.. काल मलाही तोच अनुभव पुन्हा आला आणि माझ्यासकट आपल्या तमाम फेबू कम्युनिटीचं हसू आलं.. :)

आपण सगळे किती चिंताग्रस्त असतो..आणि त्या निमित्ताने एकमेकांच्या किती उखाळ्या-पाखाळ्या काढत असतो..एकमेकांचा द्वेष करत असतो..हमरीतुमरीवर येऊन आपापले मुद्दे मांडत असतो.. !

किरण बेदी भाजपात गेली म्हणून कुणाला आनंद तर कुणाला दु:ख, मोदी हा माणूस या देशाचं भलं करणार..कुणाला याची खात्री तर कुणाला शंका.. दिल्लीत किरण सी एम बनणार की अरविंदा..म्हणून आपण चितेत..२६ जानेवारीला ओबामा येणारे म्हणून आपण आनंदीत..! :)

पण कालच्या त्या फोरासरोडच्या दुनियेत या सगळ्यापासुन मी खूप दूर गेलो..तिथे किरण बेदी काय, शाजीया इल्मी काय.. फडणवीस काय आणि मोदी काय.. कुणाला त्यांच्याबद्दल काहीही पडलेली दिसली नाही..एवढी चर्चा करायला तिथे कुणाला वेळच नव्हता.. माझा आजचा वडापाव महत्वाचा. माझा आजचा भुर्जीपाव महत्वाचा.. वह सेठ बडा दयावान है.. उसने मेरेकू पचास रुपिया टीप दिया..!

बास.. That's All..!

काल त्या नाजनीनकडे आम्ही सगळे होतो.. मी, नाजनीन, फरीदा, ढक्कन, मन्सूर.. पण ओबामा भारतात येतोय...ही गोष्ट कदाचित मला एकट्यालाच माहीत असावी..! :)

अरविंदा, शाजीया, मोदी, बेदी, फडणवीस, ओबामा, साक्षी महाराजम भाजपा, सेना, आप, पंजा..हे सगळे तुम्हाआम्हा लोकांचे भरल्या पोटी चघळायचे विषय..

फोरासरोडच्या दुनियेत १० रुपायाचा गरम वडापाव या सगळ्याहून अधिक महत्वाचा..!

-- तात्या अभ्यंकर.. 

2 comments:

Chinar Joshi said...

chhan anubhav !

Chinar Joshi said...

read my blog
http://chinarsjoshi.blogspot.in/