August 09, 2015

राधेमा सारख्यांची मानसिकता..

disclaimer - माझं हे लेखन सरसकट सर्वच्या सर्व स्त्रीजातीबद्दल मुळीच नाही हे कृपया लक्षात घ्या. परंतु मी जी काही मुंबई बघितली आहे, मग त्यात भुर्जीपावला महाग असलेला आमचा गरीब फोरास रोड आला, महागडे डान्सबार आणि त्यातल्या अत्यंत नखरेल मुली आल्या आणि जुहू-कुलाब्याचे पबही आले. या सर्वातून आणि अनुभवातून माझं जे मत बनलं आहे ते आपल्यासमोर मांडतो आहे..
--------------------------------------

आता जरा माझा एक सिरीयस ष्टडीच तुमच्यासमोर मांडतो..चक्क अभ्यासच म्हणा ना..!

एकंदरीतच दिल्ली-आग्रा-यूपी-आणि पंजाब येथील ब-याचशा मुली या जरा छानछोकी प्रिय असतात. स्वत:चंच कौतुक करून घेण्यात या पुढे असतात. त्याना डिझायनर कपडे, डिझायनर ज्वेलरी, शॉपिंग, अंगात थोडी फिल्लमबाजी इत्यादी-इत्यादीची जात्याच आवड असते. अवास्तव खर्च करणे, दिखावा करणे या गोष्टीही यात आल्या.

आता एकंदरीतच छानछोकी, डिझायनर कपडे, डिझायनर ज्वेलरी, शॉपिंग, अंगात थोडी फिल्लमबाजी या सगळ्याला अत्यंत पूरक असं वातावरण हे मुंबईत आहे. त्यामुळे यांना लहानपणापासूनच मुंबईबद्दल एक सुप्त परंतु जबर आकर्षण असतं.

या मुली रंगारुपानं ब-या असतात. कधी सुरेख असतात, कधी नाजूक असतात तर कधी चांगल्या उफाड्याच्या असतात. कुणी काही म्हणा..उत्तर हिंदुस्थानच्या मातीतच तो रंग आहे..

तर अशाच काही मुलींना कुणी एक भेटतो. हा कुणी एक जवळजवळ प्रत्येकच ठिकाणी असतो. हा त्या मुलीना मुंबईची स्वप्न दाखवतो. मी वर म्हट्ल्याप्रमाणे छानछोकी, डिझायनर कपडे, डिझायनर ज्वेलरी, शॉपिंग, अंगात थोडी फिल्लमबाजी या सगळ्याला तो इसम पुरेपूर हवा देतो. आणि believe me, त्या मुली आपली सगळी अक्कल अचानक गहाण ठेवून तो इसम म्हणेल ते, अगदी म्हणेल ते करायला तयार होतात. मायाजाली मुंबईचं आणि छानछोकीचं जबरदस्त आकर्षण त्यांची सगळी विचारशक्तीच गमावून बसतं..

आणि मग या मुली मुंबईला येतात किंवा आणल्या जातात. आणि मग इथूनच पुढे शेकडो वाटा फुटतात हे लक्षात घ्या. मग कुणी माधुरी दीक्षित होता होता एखादी extra होऊनच रहाते, कुणी कुठल्या पबमध्ये entertainer बनते, कुणी escort services वाल्यांच्या हाती लागते, कुणी डान्सबर मध्ये थिरकत लाखो कमावते, कुणी एखादी छोटी-मोठी नोकरी करून इतर वेळी चक्क call girl चा व्यवसाय करते..

अर्थात, अशाही अनेक जणी आहेत की ज्या मुंबईचं वास्तव लक्षात आल्यावर वेळीच सावरून सन्मार्गालाही लागतात, सन्माननीय मार्गाने स्वत:चं करीयर घडवतात..

ही सुखविंदर कौर ऊर्फ so called राधेमा ही ह्याच सर्वाची बळी आहे. पंजाबात लग्न केलं, दोन मुलं झाली, नवरा आखातात गेला.. परंतु मूळचं जरा बरं रंगरूप..आणि वर म्हटल्याप्रमाणे मुंबईचं सुप्त आकर्षण.. मला खात्री आहे..तू सुरेख दिसतेस, तू खूप मोठी स्टार होशील, तू देवी आहेस..वगैरे वगैरे कुठल्याही बहाण्याला ती सहज फसणारी होती आणि फसलीच..

पुढे मुंबईत आली. पण हिच्या बाबतीत तेवढी एकाच वेगळी गोष्ट झाली आणि ती म्हणजे पब, call girl, डान्स बार, escort वगैरे नेहमीच्या वाटेत न शिरता ही अध्यात्म नावाच्या बाजारात शिरली. देवी झाली. तुम्ही तिचा डिझायनर मेकप बघा, कपाळावरचा फिल्मी टिळा बघा, उंची ड्रेस, महागड्या चपला बघा..माझा वर मांडलेला मुद्दा तुम्हाला पटेल. end of the day, अध्यात्माच्या बाजारातही तिच्या मनातली छानछोकी पूर्ण झालीच की..!

पुढे तिच्या चौक्या, तिचे दरबार, तिचे महागडे भक्त..या सगळ्या गोष्टी अनिवार्यच होत्या त्यामुळे त्या इतिहासात मी जात नाही. ते आता सर्वांनाच माहीत आहे..

मी फक्त कुठेतरी या सगळ्यामागचं मूळ आणि या सगळ्यामागची मानसिकता शोधण्याचा प्रयत्न केला आहे इतकंच..

एरवी..माझ्या आध्यात्माच्या व्याख्या फार वेगळ्या आहेत. एका वेश्येत सुद्धा विठोबा पाहून तिला नमस्कार करणारे तुकोबा हीच माझी आध्यात्माची साधीसोपी व्याख्या आहे. असो!

-- (मुंबईचा) तात्या अभ्यंकर..

4 comments:

इंद्रधनु said...

अचूक विश्लेषण...

भोवरा said...

तात्या साहेब....तुमचे लिखाण म्हणजे धम्माल असते..
अगदी पु.ल. आणि व.पु. वाचल्या सारखे वाटते..

मस्तच लेख आहे...
पुलेशु

CHHATRAPATI said...

अचूक लिखाण

CHHATRAPATI said...

NICE