December 30, 2015

पाडगावकर..

आज पाडगावकर गेले. वयस्कर होते. एक ना एक दिवस जाणारच होते, ते आज गेले.

Normally कुणी दिवंगत झालं की पहिल्या दिवशी खूप दु:ख होतं आणि जसा काळ जाईल तसं ते दु:ख कमी होत जातं.. यावर आपण 'काळ हाच खरा वैद्य. तो भल्या भल्या जखमा बुजावतो..' असं म्हणतो..आणि पुढील वर्ष-दोन वर्षात माणसं सावरतात..

परंतु पाडगावकर यांच्या सारख्या मंडळींच्या बाबतीत निदान माझा तरी नेमका उलटा अनुभव आहे..

मला आज दु:ख झालं असलं तरी ते तितकंसं जाणवत नाहीये..परंतु जसा जसा काळ जाईल तसं हे दु:ख तीव्र होईल. आपण काय गमावून बसलो आहोत याची कल्पना मग जास्त त्रास द्यायला लागेल..

हाच अनुभव मला बाबूजी, भीमण्णा, भाईकाका, हृषिदा..किशोरदा, पंचमदा..यांच्या बाबतीत आला आहे.. यांच्यासारखी मंडळी तात्कालिक तेरा दिवसांचं किंवा वर्षभराचं दु:ख देत नाहीत. ही मंडळी कधीही भरून न येणा-या Long Term खोल जखमा देवून जातात..!

पाडगावकरही त्यांच्यापैकीच..!

कुमार किंवा अण्णांची एखादी गाण्याची मैफल ऐकली की दुस-या दिवशी अधिक त्रास होतो आणि मग मन सैरभैर होऊ लागतं..!

-- तात्या अभ्यंकर..

1 comment:

Unknown said...

'Padgaokar'Aprateem !!! Jeev todoon lihitos Tatya.