एका चटणी-भाकरीहून अधिक आस नाही..खरंच नाही..थोडी भाकरी आणि गडवाभर पाणी..!
एक वितेच्या भुकेस पुरते तळहाताची थाळी..
आणि बाकी साथीला असते ती भागवतधर्मात सांगितलेली नामस्मरणाची अक्षय शिदोरी..
मग त्या शिदोरीत सुदाम्याचे पोहेही असतील, ग्यानबा-तुकयाची अमृतवाणीही असेल..परंतु ते अक्षय असेल, अवीट असेल..
ऐहिक सुखं सगळ्यानाच हवीहवीशी वाटतात..त्यात काही चुकीचं आहे किंवा तो गुन्हा आहे असं म्हणण्याचा मानभावीपणा मी करणार नाही.. त्यातून मीही नाही सुटलो आणि तुम्हीही सुटला नाहीत...पण आपलं चुकतं इतकंच की आपण ती सुखं अवीट आणि अक्षय आहेत हे धरून चालतो..!
आपल्याला हेही लक्षात ठेवायला हवं की एक दिवस असा येईल की हात उचलून तोंडात घास घ्यायची देखील आपल्यात ताकद उरणार नाही..भले मग समोर उच्चप्रतीच्या सुवासिक बासमतीचा भात असेल..कानानं धड ऐकू येणार नाही..डोळ्यांनी धड दिसणार नाही..
पण तेव्हाही आपल्याला गोड वाटेल तो फक्त विठोबाच..! कारण तो अक्षय आहे..अवीट आहे..त्याकरता दिसंयाचीही गरज नाही आणि ऐकू येण्याचीही गरज नाही..
या जगात देव नाही..असं जे लोक म्हणतात त्यांचं मला हसू येतं.. माझं काही भलं झालं नाही..माझ्या आयुष्यात अमुक अमुक वाईट गोष्टी घडल्या म्हणून या जगात देव नाही..
अहो पण मुळात या सगळ्या गोष्टी तुम्हाला द्यायला देव बसलेलाच नाहीये..तो तुमचं भलंही करत नाही आणि वाईटही करत नाही..तुमचं भलं होतं किंवा तुमचं वाईट होतं ती तुमची destiny..! शिवाय भलं आणि वाईट या गोष्टी सापेक्ष आहेत..त्यात देवाचा काहीही संबंध नाही..तो या सगळ्याच्या परे आहे..परंतु तरीही त्याच्या नामस्मरणात सात्विक आनंदाचा अक्षय झरा शोधणं म्हणजेच आध्यात्म..!
ग्यानबा-तुकयाला हा अक्षय आनंदाचा झरा सापडला आणि त्यांनी तो तितक्याच उदारतेने हातचं काहीही राखून न ठेवता इदं न मम या भावनेने लोकाना वाटला म्हणून ते मोठे..म्हणून ते संत..
अन्यथा.. मला आणि माझ्या भावंडाना आमचे आईवडील टाकून गेले..आम्ही उघड्यावर पडलो..देवानं आमचं भलं केलं नाही आणि म्हणून या जगात देवच नाही..असं ज्ञानोबाना देखील सहज म्हणता आलं असतं..!
अर्थात, आमचे ज्ञानोबाराया निरीश्वरवाद्यांइतके बुद्धिमान नव्हते हे आमचं भाग्य..! :)
त्यामुळे आम्ही निरीश्वरवादी आहोत..आम्ही देव मानत नाही..असं जे लोक म्हणतात त्यांना माझ्या शुभेच्छा.. :)
-- श्री श्री तात्याशंकर..
-- (तात्यांचे आध्यात्मिक विचार.. - या महान ग्रंथातून साभार..) :)
एक वितेच्या भुकेस पुरते तळहाताची थाळी..
आणि बाकी साथीला असते ती भागवतधर्मात सांगितलेली नामस्मरणाची अक्षय शिदोरी..
मग त्या शिदोरीत सुदाम्याचे पोहेही असतील, ग्यानबा-तुकयाची अमृतवाणीही असेल..परंतु ते अक्षय असेल, अवीट असेल..
ऐहिक सुखं सगळ्यानाच हवीहवीशी वाटतात..त्यात काही चुकीचं आहे किंवा तो गुन्हा आहे असं म्हणण्याचा मानभावीपणा मी करणार नाही.. त्यातून मीही नाही सुटलो आणि तुम्हीही सुटला नाहीत...पण आपलं चुकतं इतकंच की आपण ती सुखं अवीट आणि अक्षय आहेत हे धरून चालतो..!
आपल्याला हेही लक्षात ठेवायला हवं की एक दिवस असा येईल की हात उचलून तोंडात घास घ्यायची देखील आपल्यात ताकद उरणार नाही..भले मग समोर उच्चप्रतीच्या सुवासिक बासमतीचा भात असेल..कानानं धड ऐकू येणार नाही..डोळ्यांनी धड दिसणार नाही..
पण तेव्हाही आपल्याला गोड वाटेल तो फक्त विठोबाच..! कारण तो अक्षय आहे..अवीट आहे..त्याकरता दिसंयाचीही गरज नाही आणि ऐकू येण्याचीही गरज नाही..
या जगात देव नाही..असं जे लोक म्हणतात त्यांचं मला हसू येतं.. माझं काही भलं झालं नाही..माझ्या आयुष्यात अमुक अमुक वाईट गोष्टी घडल्या म्हणून या जगात देव नाही..
अहो पण मुळात या सगळ्या गोष्टी तुम्हाला द्यायला देव बसलेलाच नाहीये..तो तुमचं भलंही करत नाही आणि वाईटही करत नाही..तुमचं भलं होतं किंवा तुमचं वाईट होतं ती तुमची destiny..! शिवाय भलं आणि वाईट या गोष्टी सापेक्ष आहेत..त्यात देवाचा काहीही संबंध नाही..तो या सगळ्याच्या परे आहे..परंतु तरीही त्याच्या नामस्मरणात सात्विक आनंदाचा अक्षय झरा शोधणं म्हणजेच आध्यात्म..!
ग्यानबा-तुकयाला हा अक्षय आनंदाचा झरा सापडला आणि त्यांनी तो तितक्याच उदारतेने हातचं काहीही राखून न ठेवता इदं न मम या भावनेने लोकाना वाटला म्हणून ते मोठे..म्हणून ते संत..
अन्यथा.. मला आणि माझ्या भावंडाना आमचे आईवडील टाकून गेले..आम्ही उघड्यावर पडलो..देवानं आमचं भलं केलं नाही आणि म्हणून या जगात देवच नाही..असं ज्ञानोबाना देखील सहज म्हणता आलं असतं..!
अर्थात, आमचे ज्ञानोबाराया निरीश्वरवाद्यांइतके बुद्धिमान नव्हते हे आमचं भाग्य..! :)
त्यामुळे आम्ही निरीश्वरवादी आहोत..आम्ही देव मानत नाही..असं जे लोक म्हणतात त्यांना माझ्या शुभेच्छा.. :)
-- श्री श्री तात्याशंकर..
-- (तात्यांचे आध्यात्मिक विचार.. - या महान ग्रंथातून साभार..) :)