घाल घाल पिंगा.. (येथे ऐका)
सुमन कल्याणपुरांचा अत्यंत सुरेल, थेट काळजाला भिडणारा आवाज
घाल घाल पिंगा वार्या माझ्या परसात
माहेरी जा, सुवासाची कर बरसात..
भादव्यातच जेमतेम वर्ष झालेल्या सासरी सखा तरी कोण मिळणार? त्यामुळे वार्यालाच सखा मानलं आहे आणि त्याच्याशी संवाद साधला आहे..
'सुखी आहे पोर' सांग आईच्या कानात..
अतिशय म्हणजे अतिशय हळवी ओळ! इतका सुंदर रिषभ आणि गंधार फार क्वचितच पाहायला मिळतो. 'रे सख्या वार्या, माझ्या माहेरी गेलास तर घरात इतर काही मंडळी असतील, वडीलधारी मंडळीही असतील.. त्यांच्यासमोर काही बोलू नकोस.. तसाच थेट माजघरात जा. तिथं माझी आई असेल.. माझं इकडचं सुख हळूच, हलकेच तिच्या कानात सांग.. खूप सुखावेल रे ती..! लगेच तुला खरवस किंवा बेसनाचा लाडू खायला देईल! खूप छान करते रे माझी आई बेसनाचे लाडू!
परसात पारिजातकाचा सडा पडे,
कधी फुलं वेचायला नेशील तू गडे?
धाकटा दीर असावा तसा संवाद आहे हा वार्याशी.. 'अरे माझं माहेरही खूप समृद्ध आहे रे.. तेथल्या परसातला पारिजातक मी इथं बसून पाहते आहे.. मला हवी आहेत रे ती सारी फुलं!
कपिलेच्या दुधावर मऊ दाट साय
माया माझ्यावर दाट जशी तुझी माय..
इथे शब्द संपतात..!
मराठी भावसंगीतातलं एक अतिशय सुरेख गाणं..नव्यानेच सासरी गेलेल्या मुलीचं यापरीस हळवं मनोगत ते कोणतं?!
-- तात्या अभ्यंकर.
June 11, 2010
एक निवेदन...
मी सुरू केलेल्या मिसळपाव डॉट कॉम या संकेतस्थळावर आजपर्यंत मुखपृष्ठाची जिम्मेदारी मी माझ्या कुवतीनुसार जे सुचेल, जे रुचेल ते लिहून सांभाळली.. इतकेच नव्हे तर मराठी संस्थळांच्या इतिहासात रोज निराळे मुखपृष्ठ व खादाडी सदर याचीही कल्पना राबविली व ती सर्वप्रथम मिपावरच सुरू केली..
परंतु या पुढे काही व्यक्तिगत कारणांमुळे मिपाचे मुखपृष्ठ व 'खादाडी सदर' ही जिम्मेदारी मला निभावता येणार नाही असे नमूद करू इच्छितो..
आजपर्यंत मिपावर सादर केलेल्या निरनिराळ्या मुखपृष्ठांबाबत अनेकांनी ती आवडल्याचे कळवले व कौतुकही केले. त्या सर्वांचा मी ऋणी आहे..
त्याचप्रमाणे मिपावर आजवर सादर केलेली मुखपृष्ठे ही या माझ्या ब्लॉगवर तसेच मनोगत डॉट कॉम या संस्थळावर 'काही स्वरचित्रे, काही शब्दचित्रे' या सदराअंतर्गत वाचायला मिळतील..
मिपाला अनेक शुभेच्छा..
धन्यवाद,
--तात्या.
June 04, 2010
काही स्वरचित्रे, काही शब्दचित्रे (३५) - माझे मन तुझे झाले..
माझे मन तुझे झाले..(येथे ऐका)
अनेक वर्षांपूर्वी आलेल्या स्वामी मालिकेतलं हे सुरेख गाणं. शब्द व संगीत सुधीर मोघेंचं. सुचित्रा बर्वेने खूप सुंदर गायलं आहे हे गाणं..
थोरले माधवराव पेशवे आणि रमाबाई. कधी नव्हे ते निवांतपणाचे दोन क्षण माधवरावांना व त्यांच्या पत्नीला मिळाले आहेत.. हे गाणं म्हणजे एक मूक संवाद, एक अनामिक ओढ, एक हुरहूर..! गूज एका प्रियकर-प्रेयसीतलं, एका पतिपत्नींतलं. विश्वास एका पतिपत्नीतला.. जगातल्या सर्वात सुंदर नात्यातला..!
खरं तर पुरीयाधनश्री रागातली एक विराणीच ही. राग पुरीयाधनश्री. पुरियाधनाश्री म्हणजे प्रार्थना, पुरियाधनाश्री म्हणजे आर्तता! केवळ अन् केवळ समर्पणाची भावना असलेला, असा हा एक विलक्षण स्वरसामर्थ्य असलेला राग!
पुरीयाधनाश्रीतलं हे गाणं म्हणजे केवळ एका प्रियकराचं आणि प्रेयसीचं बागेतलं गाणं नव्हे! माधवरावांच्या ऐन तारुण्यात जाण्याने रमामाधवाचं सहजीवन, त्यांच्यातला प्रेमसंवाद अपुराच राहिला. अतृप्तीच राहिली. अतृप्तीची भावना वाईट नसते! आयुष्याच्या सार्थकतेची, भरभरून जगलेल्या सहजीवनाची किनार जर त्या भावनेला असेल तर त्या अतृप्तीतही कुठेतरी एक आनंद असतो, एक समाधान असतं! परंतु अकाली, ऐन तारुण्यात आलेल्या मृत्युची एक भकास किनार जर तिथे असेल तर त्यातून आलेली अतृप्ती ही जीवघेणी ठरते, सरभैर, बेचैन करणारी ठरते!
वेदना जेवढी सुंदर बोलते तेवढं कुणीच बोलत नाही! आणि म्हणूनच असं म्हटलं जातं की चांगलं गाणं हे बर्याचदा वेदनेपोटीच जन्माला येतं! आणि त्यातूनच पुरीयाधनाश्रीतली ही विराणीही जन्म घेते व जीवाला चटका लावून जाते!
-- तात्या अभ्यंकर.
अनेक वर्षांपूर्वी आलेल्या स्वामी मालिकेतलं हे सुरेख गाणं. शब्द व संगीत सुधीर मोघेंचं. सुचित्रा बर्वेने खूप सुंदर गायलं आहे हे गाणं..
थोरले माधवराव पेशवे आणि रमाबाई. कधी नव्हे ते निवांतपणाचे दोन क्षण माधवरावांना व त्यांच्या पत्नीला मिळाले आहेत.. हे गाणं म्हणजे एक मूक संवाद, एक अनामिक ओढ, एक हुरहूर..! गूज एका प्रियकर-प्रेयसीतलं, एका पतिपत्नींतलं. विश्वास एका पतिपत्नीतला.. जगातल्या सर्वात सुंदर नात्यातला..!
खरं तर पुरीयाधनश्री रागातली एक विराणीच ही. राग पुरीयाधनश्री. पुरियाधनाश्री म्हणजे प्रार्थना, पुरियाधनाश्री म्हणजे आर्तता! केवळ अन् केवळ समर्पणाची भावना असलेला, असा हा एक विलक्षण स्वरसामर्थ्य असलेला राग!
पुरीयाधनाश्रीतलं हे गाणं म्हणजे केवळ एका प्रियकराचं आणि प्रेयसीचं बागेतलं गाणं नव्हे! माधवरावांच्या ऐन तारुण्यात जाण्याने रमामाधवाचं सहजीवन, त्यांच्यातला प्रेमसंवाद अपुराच राहिला. अतृप्तीच राहिली. अतृप्तीची भावना वाईट नसते! आयुष्याच्या सार्थकतेची, भरभरून जगलेल्या सहजीवनाची किनार जर त्या भावनेला असेल तर त्या अतृप्तीतही कुठेतरी एक आनंद असतो, एक समाधान असतं! परंतु अकाली, ऐन तारुण्यात आलेल्या मृत्युची एक भकास किनार जर तिथे असेल तर त्यातून आलेली अतृप्ती ही जीवघेणी ठरते, सरभैर, बेचैन करणारी ठरते!
वेदना जेवढी सुंदर बोलते तेवढं कुणीच बोलत नाही! आणि म्हणूनच असं म्हटलं जातं की चांगलं गाणं हे बर्याचदा वेदनेपोटीच जन्माला येतं! आणि त्यातूनच पुरीयाधनाश्रीतली ही विराणीही जन्म घेते व जीवाला चटका लावून जाते!
-- तात्या अभ्यंकर.
May 27, 2010
ललीमावशी...
माझी मैत्रीण ललीमावशी गेली. अलीकडे तशी आजारी-आजारीच असायची.
ललीमावशी!
ललिता सुधीर फडके.. माझे गुरुजी - थोर संगीतकार, गायक बाबूजी यांची पत्नी. स्वत:ही एक उत्तम गायिका असलेली ललीमावशी!
ललिताबाई फडके म्हणून सर्वांना परिचित. मी तिला 'ललीमावशी' म्हणायचा. वास्तविक ती मला वयानं, मानानं, अनुभवानं, ज्ञानानं खूप वडील. तरीही तिचा उल्लेख मी माझी 'मैत्रीण' असा केला आहे, याला कारण तिचं माझ्याशी वागणं..एखाद्या जवळच्या जिवलग मैत्रिणीसारखीच ती मला भासायची, तसं माझ्याशी वागायची..खूप लोभ होता तिचा माझ्यावर..
शंकर निवास, शिवाजी पार्क, मुंबई, हे माझं श्रद्धास्थान.. तिथे बाबूजी-ललीमावशी राहायचे. त्या वास्तूत मी अनेकदा गेलो आहे.. बाबूजींना खूप घाबरायचो मी. बाबूजींना भेटायचं, त्यांच्या पायावर डोकं ठेवायचं.. सतत कुठल्याश्या कामात व्यग्र असलेले बाबूजी जुजबी बोलायचे.. कधी मुडात असले म्हणजे, "काय पंडितजी, काय म्हणतोय तुमच्या गाण्याचा अभ्यास? आम्हाला केव्हा ऐकवणार तुमचं गाणं?" अशी थट्टाही करायचे. पण मी त्यांच्या पुढ्यात फार काळ थांबत नसे.
.
सगळी भीड, भिती गळून पडायची ती ललीमावशी भेटल्यावर.. "अरे ये ये. ब-याच दिवसांनी आलास! तुला माझी आठवणच होत नाही.. त्यातून तू काय बुवा, बाबूजींचा भक्त!" असं हसून म्हणायची..
मग अगदी भरपूर मनसोक्त गप्पा मारायची माझ्यासोबत. तिला खूप बोलायला हवं असायचं माझ्याशी.. गीतरामायणाच्या आधीपासून ते वीर सावरकर चित्रपटापर्यंतचा खूप मोठा कालावधी पाहिला होता तिनं. अनेक गमतीशीर, सुखदु:खाच्या, लहानमोठ्या घटनांची साक्षीदार होती ती..भरभरून बोलायची.
बाबूजींच्या आयुष्यातल्या अनेक सुखदु:खाच्या-मान-अपमानाच्या प्रसंगात, वीर सावरकर चित्रपट पूर्ण होण्यास झालेल्या विलंबामुळे बाबूजींना होणार्या असह्य मनस्तापात, बाबूजींच्या लहानमोठ्या आजारपणात, अत्यंत खंबीरपणे केवळ एक पत्नी म्हणून नव्हे तर एक 'शक्ती' म्हणून बाबूजींच्या पाठीशी उभी असलेली ललीमावशी!
श्रीधररावांचंही तिला खूप कौतुक.. "अरे तू तो अमका अमका अभंग ऐकला आहेस काय? तू ते अमकं गाणं ऐकलं आहेस काय? श्रीधरनं केलं आहे!" असं मला कौतुकानं सांगायची..कधी श्रीधरपंतही घरी असायचे. मग त्या शंकरनिवासच्या आतल्या लहानश्या खोलीत कॉटवर बसलेली ललीमावशी आणि तिच्या पायाशी हार्मोनियम घेऊन मला नव्या नव्या चाली ऐकवणारे श्रीधरराव आणि मी श्रोता! अशी ती भरलेली छोटेखानी संगीतसभा मला आजही आठवते.. श्रीधरपंतही अगदी हौसेने, आनंदाने, आपुलकीने त्यांच्या नव्या नव्या चाली मला ऐकवायचे.. ललीमावशी चेहेर्यावरून सांडलेलं कौतुक आजही माझ्या डोळ्यासमोर आहे..
कधी कधी "तू काय बुवा, अभिजात संगीतवाला. त्यातून साक्षात भीमण्णांचा शिष्य..!" अशीही माझी टिंगल करायची.. मी बांधलेल्या बंदिशी अगदी आवर्जून ऐकायची, मनमोकळी दाद द्यायची! सुवासिनी चित्रपटात 'आज मोरे मन..' ही तोडीतली बंदिश अण्णांनी आणि ललीमावशींनी मिळून गायली आहे.. काही कारणाने अण्णा बरेच उशिरा आले, मग कसं रेकॉर्डिंग केलं, बाबूजींच्या सूचना काय होत्या..अश्या अनेक आठवणीत ललीमावशी रमून जायची.. "तू पुण्यालाच राहायला का जात नाहीस? म्हणजे भीमण्णा तुला अगदी सकाळ-संध्याकाळ गाण्याची तालीम देतील.. मी सांगेन त्यांना!" असं म्हणायची!
उदार, दानी स्वभावाची माझी ही मैत्रीण स्वत: उत्तम सुगरणही होती.. शाकाहारी-मांसाहारी, जेवण कुठलंही असो, तिच्या हाताला चव होती.. मी ती चव अनुभवली आहे.. माहेरची देऊळगावकर. म्हणजे सारस्वत असल्यामुळे मासळीचा स्वयंपाकही ती उत्तम करत असे..
आणि आल्यागेल्याचं अगत्य? अक्षरश: असंख्य लोकांचं त्या घरी येणंजाणं असे..पण कधी कुणी त्या घरातून विना काही खाल्ल्याशिवाय गेलं नाही.. लाडू-वडी-चकली-चिवडा, घरात खास काही बनवलेलं असेल तर ते, जे काही असेल ते ललीमावशी आलेल्यागेलेल्याच्या हातावर ठेवायची..!
ललीमावशीला बटाटावडा फार आवडायचा.. मग बरेचदा त्यांच्या घरासमोरच असलेल्या प्रकाशचा बटाटवडा मी तिच्याकरता घेऊन जायचा. "आला का माझा बाबू बटाटेवडा घेऊन?" असं कौतुकाने म्हणायची.. मग आम्ही दोघं आवडीनं बटाटावडा खायचो.. पुन्हा मग ती गप्पात रमून जायची..जुना काळ आपसूक माझ्या पुढ्यात उलगडायला लागायचा! मध्येच, "बाबूजी बसले आहेत बघ आतल्या खोलीत.. त्यांना नेऊन दे पाहू हा वडा..घाबरू नकोस हं. बिनधास्त जा! ते काही तुझ्यावर रागावणार नाहीत!" असं मिश्किलपणे म्हणायची माझी ही मैत्रीण!

असो..
'मोठं मोठं डोळं तुजं..' हे ललीमावशीचं गाणं उगाचच कानी गुणगूण करून राहिलं आहे..
चालायचंच एकंदरीत! जुना काळ मागे पडतो आहे, जुनी माणसं पिकल्या पानासारखी गळून पडताहेत.. अजून भाग्य इतकंच की आशीर्वादाचा एक थरथरता हात पुण्यात भीमण्णांच्या रुपाने अजूनही आहे.. माझ्या मस्तकावरचे अन्य आशीर्वादाचे हात अदृश्य होत आहेत.. भाईकाका गेले, बाबूजी गेले, ललीमावशीही गेली...
पुन्हा कधीतरी शिवाजी पार्कात जाणं होईलच.. पाय आपसूकच प्रकाशकडे वळतील आणि नकळतच बटाटावड्यांची पार्सल ऑर्डर माझ्याकडून जाईल..पण कुणासाठी?? समोरच्या शंकरनिवासात तो बटाटावडा आवडीनं, चवीनं आणि मुख्य म्हणजे कौतुकानं खाणारं आता कुणीच नसेल!
-- तात्या अभ्यंकर.
ललीमावशी!
ललिता सुधीर फडके.. माझे गुरुजी - थोर संगीतकार, गायक बाबूजी यांची पत्नी. स्वत:ही एक उत्तम गायिका असलेली ललीमावशी!
ललिताबाई फडके म्हणून सर्वांना परिचित. मी तिला 'ललीमावशी' म्हणायचा. वास्तविक ती मला वयानं, मानानं, अनुभवानं, ज्ञानानं खूप वडील. तरीही तिचा उल्लेख मी माझी 'मैत्रीण' असा केला आहे, याला कारण तिचं माझ्याशी वागणं..एखाद्या जवळच्या जिवलग मैत्रिणीसारखीच ती मला भासायची, तसं माझ्याशी वागायची..खूप लोभ होता तिचा माझ्यावर..
शंकर निवास, शिवाजी पार्क, मुंबई, हे माझं श्रद्धास्थान.. तिथे बाबूजी-ललीमावशी राहायचे. त्या वास्तूत मी अनेकदा गेलो आहे.. बाबूजींना खूप घाबरायचो मी. बाबूजींना भेटायचं, त्यांच्या पायावर डोकं ठेवायचं.. सतत कुठल्याश्या कामात व्यग्र असलेले बाबूजी जुजबी बोलायचे.. कधी मुडात असले म्हणजे, "काय पंडितजी, काय म्हणतोय तुमच्या गाण्याचा अभ्यास? आम्हाला केव्हा ऐकवणार तुमचं गाणं?" अशी थट्टाही करायचे. पण मी त्यांच्या पुढ्यात फार काळ थांबत नसे.
.
सगळी भीड, भिती गळून पडायची ती ललीमावशी भेटल्यावर.. "अरे ये ये. ब-याच दिवसांनी आलास! तुला माझी आठवणच होत नाही.. त्यातून तू काय बुवा, बाबूजींचा भक्त!" असं हसून म्हणायची..
मग अगदी भरपूर मनसोक्त गप्पा मारायची माझ्यासोबत. तिला खूप बोलायला हवं असायचं माझ्याशी.. गीतरामायणाच्या आधीपासून ते वीर सावरकर चित्रपटापर्यंतचा खूप मोठा कालावधी पाहिला होता तिनं. अनेक गमतीशीर, सुखदु:खाच्या, लहानमोठ्या घटनांची साक्षीदार होती ती..भरभरून बोलायची.
बाबूजींच्या आयुष्यातल्या अनेक सुखदु:खाच्या-मान-अपमानाच्या प्रसंगात, वीर सावरकर चित्रपट पूर्ण होण्यास झालेल्या विलंबामुळे बाबूजींना होणार्या असह्य मनस्तापात, बाबूजींच्या लहानमोठ्या आजारपणात, अत्यंत खंबीरपणे केवळ एक पत्नी म्हणून नव्हे तर एक 'शक्ती' म्हणून बाबूजींच्या पाठीशी उभी असलेली ललीमावशी!
श्रीधररावांचंही तिला खूप कौतुक.. "अरे तू तो अमका अमका अभंग ऐकला आहेस काय? तू ते अमकं गाणं ऐकलं आहेस काय? श्रीधरनं केलं आहे!" असं मला कौतुकानं सांगायची..कधी श्रीधरपंतही घरी असायचे. मग त्या शंकरनिवासच्या आतल्या लहानश्या खोलीत कॉटवर बसलेली ललीमावशी आणि तिच्या पायाशी हार्मोनियम घेऊन मला नव्या नव्या चाली ऐकवणारे श्रीधरराव आणि मी श्रोता! अशी ती भरलेली छोटेखानी संगीतसभा मला आजही आठवते.. श्रीधरपंतही अगदी हौसेने, आनंदाने, आपुलकीने त्यांच्या नव्या नव्या चाली मला ऐकवायचे.. ललीमावशी चेहेर्यावरून सांडलेलं कौतुक आजही माझ्या डोळ्यासमोर आहे..
कधी कधी "तू काय बुवा, अभिजात संगीतवाला. त्यातून साक्षात भीमण्णांचा शिष्य..!" अशीही माझी टिंगल करायची.. मी बांधलेल्या बंदिशी अगदी आवर्जून ऐकायची, मनमोकळी दाद द्यायची! सुवासिनी चित्रपटात 'आज मोरे मन..' ही तोडीतली बंदिश अण्णांनी आणि ललीमावशींनी मिळून गायली आहे.. काही कारणाने अण्णा बरेच उशिरा आले, मग कसं रेकॉर्डिंग केलं, बाबूजींच्या सूचना काय होत्या..अश्या अनेक आठवणीत ललीमावशी रमून जायची.. "तू पुण्यालाच राहायला का जात नाहीस? म्हणजे भीमण्णा तुला अगदी सकाळ-संध्याकाळ गाण्याची तालीम देतील.. मी सांगेन त्यांना!" असं म्हणायची!

उदार, दानी स्वभावाची माझी ही मैत्रीण स्वत: उत्तम सुगरणही होती.. शाकाहारी-मांसाहारी, जेवण कुठलंही असो, तिच्या हाताला चव होती.. मी ती चव अनुभवली आहे.. माहेरची देऊळगावकर. म्हणजे सारस्वत असल्यामुळे मासळीचा स्वयंपाकही ती उत्तम करत असे..
आणि आल्यागेल्याचं अगत्य? अक्षरश: असंख्य लोकांचं त्या घरी येणंजाणं असे..पण कधी कुणी त्या घरातून विना काही खाल्ल्याशिवाय गेलं नाही.. लाडू-वडी-चकली-चिवडा, घरात खास काही बनवलेलं असेल तर ते, जे काही असेल ते ललीमावशी आलेल्यागेलेल्याच्या हातावर ठेवायची..!
ललीमावशीला बटाटावडा फार आवडायचा.. मग बरेचदा त्यांच्या घरासमोरच असलेल्या प्रकाशचा बटाटवडा मी तिच्याकरता घेऊन जायचा. "आला का माझा बाबू बटाटेवडा घेऊन?" असं कौतुकाने म्हणायची.. मग आम्ही दोघं आवडीनं बटाटावडा खायचो.. पुन्हा मग ती गप्पात रमून जायची..जुना काळ आपसूक माझ्या पुढ्यात उलगडायला लागायचा! मध्येच, "बाबूजी बसले आहेत बघ आतल्या खोलीत.. त्यांना नेऊन दे पाहू हा वडा..घाबरू नकोस हं. बिनधास्त जा! ते काही तुझ्यावर रागावणार नाहीत!" असं मिश्किलपणे म्हणायची माझी ही मैत्रीण!


असो..
'मोठं मोठं डोळं तुजं..' हे ललीमावशीचं गाणं उगाचच कानी गुणगूण करून राहिलं आहे..
चालायचंच एकंदरीत! जुना काळ मागे पडतो आहे, जुनी माणसं पिकल्या पानासारखी गळून पडताहेत.. अजून भाग्य इतकंच की आशीर्वादाचा एक थरथरता हात पुण्यात भीमण्णांच्या रुपाने अजूनही आहे.. माझ्या मस्तकावरचे अन्य आशीर्वादाचे हात अदृश्य होत आहेत.. भाईकाका गेले, बाबूजी गेले, ललीमावशीही गेली...
पुन्हा कधीतरी शिवाजी पार्कात जाणं होईलच.. पाय आपसूकच प्रकाशकडे वळतील आणि नकळतच बटाटावड्यांची पार्सल ऑर्डर माझ्याकडून जाईल..पण कुणासाठी?? समोरच्या शंकरनिवासात तो बटाटावडा आवडीनं, चवीनं आणि मुख्य म्हणजे कौतुकानं खाणारं आता कुणीच नसेल!
-- तात्या अभ्यंकर.
April 23, 2010
काही स्वरचित्रे, काही शब्दचित्रे (३४) - व्हायलीन ब्रदर्सची बंदिश सिंफनी...
![]() |
बंदिश सिंफनी.. (येथे ऐका)
उस्ताद अमज़द अली खान. हिंदुस्थानी संगीत क्षेत्रातलं एक दिग्गज व्यक्तिमत्व..त्यांचे शिष्य देबशंकर आणि ज्योतीशंकर हे 'व्हायलीन ब्रदर्स' म्हणून प्रसिद्ध आहेत.. हे व्हायलीन बंधु हिंदुस्थानी आणि पाश्चिमात्य अभिजात संगीतात खूप चांगलं काम करत आहेत..पं रविशंकर, उस्ताद अमजदालि खासाहेब, त्याचप्रमाणे झुबिन मेहता यांच्याकडूनही त्यांना उत्तम मार्गदर्शन मिळालं आहे..
'बंदिश सिंफनी'ची मूळ संकल्पना आणि संगीत उस्ताद अमजद अलींचे. राग यमन! यमनाची अगदी सुंदर सुरावट बांधली आहे खासाहेबांनी. आलाप-जोड-झाला आणि गत या अंगाने जाणारं प्रत्येक स्वरावलीतलं स्वरांचं नक्षिकाम आणि लयीची गुंफण अतिशय सुरेख..लयीचं काम तर विशेष छान झालं आहे! व्हायलीन ब्रदर्सनी अर्थातच अगदी लयदार, सुरेल, वाजवलं आहे. तानक्रिया सफाईदार आहे. तबला-मृदुंगासहीतचा सारा वाद्यमेळही त्यांनीच बांधला आहे..
अवघ्या तीन-साडेतीन मिनिटांचा हा यमन निश्चितच भव्यदिव्य आहे, श्रवणीय आहे.. यमनची ही सुरेख हार्मनी-सिंफनी मनाला आनंद देऊन जाते!
-- तात्या अभ्यंकर.
April 21, 2010
स्वामी नित्त्यानंद, स्वामी तात्यानंद आणि आपली रंजिता... :)
हल्लीच्या दुनियेत 'स्वामी', 'बाबा' किंवा तत्सम कुणीही धर्मोपदेशक म्हटला की तो अंमळ बाईलवेडा असतो असे आमच्या पाहण्यात आले आहे.. मग तो स्वामी नित्त्यानंद असो की आणखी कुणी स्वामी तात्यानंद असो.. त्यातूनही ती बया जर दाक्षिणात्य नटी असेल तर मग बघायलाच नको..; )


अलीकडेच स्वामी नित्त्यानंद आणि आपली सर्वांची लाडकी दाक्षिणात्य नटी रंजिता यांच्या काही चित्रफिती एक तमिळ वाहिनीने प्रसिद्ध केल्या आणि गूगलची पानंच्या पानं ओसंडून वाहू लागली! तूनळीवर चित्रफितीही प्रसिद्ध झाल्या आहेत..
आता ही बातमी खरी का खोटी?
स्वामींच्या संस्थळाने अर्थातच ह्या प्रकरणात स्वामीजींना विनाकारणच फसवलं गेलं आहे असा खुलासा आहे..
बाकी अन्यत्र तमाम ब्लॉग्जवर मंडळी चवीचवीने चर्चा करताहेत.. अहो पण मी म्हणतो की समजा असेल ही बातमी खरी तर त्यात इतका गहजब करण्याजोगं काय आहे? स्वामींना काही भावना नाहीत? असेल त्यांचा त्या रंजिता शिष्येवर अंमळ लोभ.. आणि म्हणूनच तिच्यावर विशेष अनुग्रह करण्याचे वेगवेगळे मार्ग ते अवलंबत असतील! कुणी सांगावं?! :)

पाहा बरं किती छान शिक्षण सुरू आहे ते!; )
आणि अहो आमची रंजिता तर आहेच छान, अगदी कुणालाही आवडावी अशी.. छानच दिसते ब्वॉ! अंगापिंडाने सशक्त, तारुण्याने मुसमुसलेली आणि अगदी उफाड्याची! :)

तर मला सांगा, असं काय मोठं विशेष चुकलं हो आपल्या नित्त्यानंद स्वामींचं?! :)
हे स्कँडल खरं की खोटं?
खरं असल्यास आपल्याला हे कितपत गंभीर वाटतं? की यात काही विशेष गैर नाही असं आपलं म्हणणं आहे? :)
होऊ द्यात पाहू अंमळ विस्तृत आणि साधकबाधक चर्चा! :)

धन्यवाद,
आपला,
स्वामी तात्यानंद!
देवासकरांची कोठी,
इंदौर.

अलीकडेच स्वामी नित्त्यानंद आणि आपली सर्वांची लाडकी दाक्षिणात्य नटी रंजिता यांच्या काही चित्रफिती एक तमिळ वाहिनीने प्रसिद्ध केल्या आणि गूगलची पानंच्या पानं ओसंडून वाहू लागली! तूनळीवर चित्रफितीही प्रसिद्ध झाल्या आहेत..
आता ही बातमी खरी का खोटी?
स्वामींच्या संस्थळाने अर्थातच ह्या प्रकरणात स्वामीजींना विनाकारणच फसवलं गेलं आहे असा खुलासा आहे..
बाकी अन्यत्र तमाम ब्लॉग्जवर मंडळी चवीचवीने चर्चा करताहेत.. अहो पण मी म्हणतो की समजा असेल ही बातमी खरी तर त्यात इतका गहजब करण्याजोगं काय आहे? स्वामींना काही भावना नाहीत? असेल त्यांचा त्या रंजिता शिष्येवर अंमळ लोभ.. आणि म्हणूनच तिच्यावर विशेष अनुग्रह करण्याचे वेगवेगळे मार्ग ते अवलंबत असतील! कुणी सांगावं?! :)

पाहा बरं किती छान शिक्षण सुरू आहे ते!; )
आणि अहो आमची रंजिता तर आहेच छान, अगदी कुणालाही आवडावी अशी.. छानच दिसते ब्वॉ! अंगापिंडाने सशक्त, तारुण्याने मुसमुसलेली आणि अगदी उफाड्याची! :)

तर मला सांगा, असं काय मोठं विशेष चुकलं हो आपल्या नित्त्यानंद स्वामींचं?! :)
हे स्कँडल खरं की खोटं?
खरं असल्यास आपल्याला हे कितपत गंभीर वाटतं? की यात काही विशेष गैर नाही असं आपलं म्हणणं आहे? :)
होऊ द्यात पाहू अंमळ विस्तृत आणि साधकबाधक चर्चा! :)
धन्यवाद,
आपला,
स्वामी तात्यानंद!
देवासकरांची कोठी,
इंदौर.
काही स्वरचित्रे, काही शब्दचित्रे (३३) - बीज अंकुरे अंकुरे..
![]() |
'वृक्षवल्ली आम्हा..' (येथे ऐका)
अगदी साधीसरळ आणि तितकीच गोड चाल, चिपळ्यांचा ठेका, आणि विष्णुपंत पागनीसांची सुरेल, प्रासादिक गायकी. अतिशय सुरेख..!
'वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे
पक्षीही सुस्वरे आळविती..'
आज तुम्हीआम्ही जंगलतोड वाचवा, झाडं लावा, झाडं जगवा असं म्हणून जिवाचा आटापिटा करत असतो.. परंतु तुकोबांचा द्रष्टेपणा पाहा..त्यांनी फारा वर्षापूर्वीच वृक्षवल्लींची महती गायली आहे.. नव्हे, त्यांना आपले सगेसोयरे मानले आहे!
'पक्षीही सुस्वरे आळविती..!'
किती सुंदर शब्द आहेत, सुंदर भाषा आहे! गाण्याच्या पार्श्वभूमीवर ही पक्षांची सुस्वर गायकी कानाला फार छान लागते!
'आमचा ना, चांगला ६००० स्क्वे.फुटाचा ब्लॉक आहे!', 'आमचं हे भलं मोठ्ठं फार्महाऊस आहे बरं का!' अश्या बढाया तुम्हीआम्ही मारत असतो. परंतु तुकोबांची श्रीमंती पाहा.. ते म्हणतात,
आकाश मंडप, पृथिवी आसन
रमे तेथे मन क्रीडा करी!
सहा-सात हजार स्क्वे.फुटांचा संकुचितपणा तुकोबांना जमत नाही!

तुका म्हणे होय मनासी संवाद
आपुलाचि वाद आपणासि!
किती मोठी गोष्ट सांगून गेलेत तुकोबा! 'मनासी संवाद..' असला म्हणजे पुरे.. कुणाचं कौन्सिलिंग नको, कधीही न संपणार्या चर्चा नकोत, मतमतांतरे नकोत, तंटेबखेडे नकोत..
'आपुलाचि वाद आपणासि!'.... हेच खरं!
-- तात्या अभ्यंकर.
April 16, 2010
काही स्वरचित्रे, काही शब्दचित्रे (३२) - बीज अंकुरे अंकुरे..
बीज अंकुरे अंकुरे
ओल्या मातीच्या कुशीत
कसे रुजावे बियाणे
माळरानी खडकात?
एक अतिशय सुंदर, हळवं गाणं..अगदी ओल्या मातीचाच ओलावा असलेलं, तिची माया असलेलं! गाण्याची चाल जेवढी गोड तेवढीच समजावणीची..अशी की ओल्या मातीची महती सांगताना माळरानी खडकाची कुठेही अवहेलना नाही.. परंतु त्यात बियाणं मात्र रुजू शकत नाही इतकंच सांगणं! याचं कारण 'माळरानी खडकात' ची 'मनीधगरे ममपप' ही सुरेख स्वरसंगती..
हवी अंधारल्या राती
चंद्रकिरणांची साथ
कसे रुजावे बियाणे
माळरानी खडकात..
मधुकर आरकड्यांचे सुंदर शब्द, अशोक पत्की/सुरेशकुमार यांचं संगीत असलेलं हे गाणं अरुण इंगळेनी अगदी हळवेपणाने, जीव लावून गायलं आहे.. यात ओल्या मातीचा सुवास आहे, हळवेपणा आहे, गोडवा आहे, ममत्व आहे..गाण्यातली बासरीही फार सुरेख..!
मन तृप्त करणार्या या गाण्याचं हे दोन ओळींचं वेडंवाकडं विवेचन कविवर्य विंदा करंदीकरांना सादर समर्पित.. आणि त्या आभाळाइतक्या मोठ्या माणसाला मानाचा मुजरा..!
-- तात्या अभ्यंकर.
मम सुखाची ठेव..

ती आली, तिनं पाहिलं, तिनं जिंकलं!
ती स्वरलता आहे, ती गानसम्राज्ञी आहे, ती मेलडीक्वीन आहे.....!
षड्ज पंचम भावातला सुरेल जुळलेला तानपुरा,
अन् त्यातला नैसर्गिक शुद्ध गंधार..
तो तर तिच्या गळ्यातच आहे...!
नव्हे, तर त्या गंधाराचं तंबोर्यातलं स्वयंभुत्व
हे तिच्या गळ्यानेच सिद्ध केलेलं आहे...!
कोमल अन् शुद्ध रिखभ, हे एरवी एकमेकांचे वैरी,
स्वभावाने अगदी एकदुसर्याच्या विरुद्ध,
परंतु दोघेही तिचेच आहेत...!
तोडीत दिसणारं कोमल गंधाराचं कारुण्य
हे तिनंच दाखवलं आम्हाला...
आणि बागेश्रीतला शृंगारिक कोमल गंधारही
तिनंच शिकवला आम्हाला...!
तिने स्वर लावल्यावर
तीव्र मध्यमातली अद्भुतता दिसली आम्हाला...
आणि शुद्ध मध्यमाचं गारुडही तिनंच घातलं आम्हाला...!
तिच्या पंचमातली अचलता आम्ही अनुभवली...
महासागराच्या ऐन मध्यावर एखाद्या जहाजाला
जसा एक आश्वासक सहारा मिळावा,
तसा सहारा, तसा आधार हा तिचाच पंचम देतो....!
हा पंचम एक आधारस्तंभ स्वर आहे,
आरोही-अवरोही हरकतींचं ते एक अवचित विश्रांतिस्थान आहे,
हे तिनं गायल्यावरच पटतं आम्हाला...!
तिच्याइतका सुरेख, तिच्या इतका गोड
शुद्ध धैवत गाऊच शकत नाही कुणी....
आणि तिच्याइतकं कुणीच दाखवू शकत नाही,
कोमल धैवताचं प्रखरत्व आणि त्याचं समर्पण....!
कोमल निषादाचं ममत्व अन् देवत्व,
तिच्यामुळेच सिद्ध होतं...
आणि तिच्या शुद्ध निषादामुळेच कळली आम्हाला
गाण्यातली मेलडी...!
आणि तिचा तार षड्ज?
गायकी म्हणजे काय, पूर्णत्व म्हणजे काय,
गाण्याचा असर म्हणजे काय,
हे तिथंच कळतं आम्हाला, तिथंच जाणवतं...तिच्या तार षड्जात..!
तिचा तार षड्जच पूर्ण करतो आमच्या
सगुण-निर्गुणाच्या अन् अध्यात्माच्या व्याख्या...
आणि तोच भाग पाडतो आम्हाला,
ईश्वरी संकल्पनेवर विश्वास ठेवायला....!
ती गाते आहे, आम्ही ऐकतो आहोत...
सलीलदा, सचिनदा, पंचमदा, मदनमोहन, नौशादमिया
अन् कितीतरी अनेक..
तिच्या गळ्याकरताच केवळ,
पणाला लावतात आपली अलौकिक प्रतिभा...!
अन् तिच्याकडे पाहूनच
खुला करतात बाबुजी
"ज्योती कलश छलके"चा अमृतकुंभ...!
तिचं गाणं हा आमचा अभिमान आहे...
तिचं गाणं हा आमचा अहंकार आहे...
तिचं गाणं ही आमची गरज आहे...
तिचं गाणं ही आमची सवय आहे....
तिचं गाणं हे आमचं व्यसन आहे....
तिचं गाणं हे आमचं औषध आहे...
तिचं गाणं ही आमची विश्रांती आहे...
आणि
तिचं गाणं हेच आमचं सुख-समाधान आहे...
इतकंच म्हणेन की,
अन्न, वस्त्र, निवारा ह्या आमच्या मूलभूत गरजा.
त्यात आता तिच्या गाण्याचीही भर पडली आहे...!
शब्द खूप तोकडे आहेत,
तेव्हा पुरे करतो आता हे शाब्दिक बुडबुडे...
शेवटी एवढंच सांगून थांबतो की तिचं गाणं ही
"मम सुखाची ठेव" आहे!
"मम सुखाची ठेव" आहे!
--(तिचा भक्त, तिचा चाहता, तिचा प्रेमी!) तात्या अभ्यंकर.
काही स्वरचित्रे, काही शब्दचित्रे (3१) - डोली मे बिठाई के कहार...
![]() |
लाए मोहे सजनाके द्वार..
(येथे ऐका)
'ओ रामा रे..!'
थोरल्या बर्मदांची खास बंगाली ढंगाची गायकी.. आवाजाची जात जरा वेगळीच, परंतु स्वर मात्र सच्चा, अगदी सुरेल! खेमट्याचा किंवा दुगुन रुपकचा छान ठेका.. बंगाली लोकसंगीतातून जन्माला आलेली चाल..सचिनदा अगदी मन लावून गाताहेत...एकतानतेने एका परित्यक्तेची कर्मकहाणी सांगताहेत!
खास करून पश्चिम बंगालचा सामाजिक आशय असलेलं गाणं.. मूल होत नाही म्हणून बायकोला अगदी सहजरित्या टाकून दुसरं लग्न करणे आणि पहिलीचा छळ सुरू होऊन तिची हकालपट्टी होणे. पुन्हा माहेरी जायची सोय नाही कारण माहेरी खाणार काय? माजोरी सरंजामशाही, सावकारी आणि त्यामुळे पश्चिम बंगालच्या खेड्यापड्यात उत्पन्न झालेली वर्षानुवर्षाची गरीबी आणि सहज दृष्टीस पडणारी अन्नान्न दशा..!
पतझड, ओ बन गयी पतझड, बैरन बहार..!
आणि परित्यक्तेपासून ते कोठ्यापर्यंतचा पुढला प्रवास! तिथे भेटणारा एक संगीतरसिक, द्रोणातून कचोरी-समोसे आणि मिठाई आणणारा, जीव ओवाळून टाकणारा कुणी आनंदबाबू..! 'रैना बिती जाए', 'चिन्गारी कोई भडके' यासारखी एकसे एक गाणी देणारे पंचमदा, किशोरदा आणि दिदि!
अमरप्रेम! सामाजिक आशय असलेली उत्तम कथा, उत्तम संगीत, उत्तम अभिनय! हिंदी चित्रपटसृष्टीला पुन्हा येतील का हो असे वैभवाचे दिवस?
-- तात्या अभ्यंकर.
Subscribe to:
Posts (Atom)



