November 04, 2014

आपण फक्त आपल्यापुरतं बोलावं...

हम्म.. फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासून आणि नाथाभाऊंनी केलेल्या विधानापासून एकंदरीतच गेल्या दोन दिवसात FB वर ब्राह्मण-बहुजन असा बराच राडा वाचायला मिळाला..

असो..

प्रत्येकाची मतं.. प्रत्येकाचे विचार...

माझ्यापुरतं बोलायचं तर आमचे गुरुवर्य पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे यांच्या आज्ञेनुसार जातीपाती या फक्त खाद्यपदार्थांपर्यंतच मर्यादित असाव्यात हेच मी मानतो.. जातीपाती टिकाव्यात..परंतु त्या फक्त खाण्यापिण्यापुरत्या..

म्हणजे ब्राह्मणाकडे अळूचं फदफदं, डाळिंबी उसळ.. कायस्थाकडे वालाचं बिरडं, कानवले.. एखाद्या बावनकशी शाण्णव कुळी मराठ्याकडे झणझणीत मटण.. एखाद्या कुडाळ देशकराकडे तिरफळं घातलेलं बांगड्याचं कालवण..तर एखाद्या कोळ्याकडे किंवा आगर्‍याकडे त्यांच्या पद्धतीचं मटण किंवा मग सुक्या बांगड्याचं भुजणं..!

बास.. जातीपाती या इतपतच असाव्यात..

असो..

पण गेल्या दोन दिवसात FB वर एकंदरीतच जी काही गरळ वाचायला मिळाली त्याने जरा दु:खी झालो आहे.. अर्थात, मला दोष कुणालाच द्यायचा नाही.. प्रत्येकाची मतं.. आपण फक्त आपल्यापुरतं बोलावं...

-- (जातीने ब्राह्मण, मनाने कोळी) तात्या वेसावकर.. :)

1 comment:

Aditya Patil said...

मस्त! मस्त!! मस्त!!!