November 15, 2014

काहीच नको शिकुया..

तिथे पुण्यात वेडझव्यासाराखा पाउस पडतोय म्हणे..
इथे मुंबईत भयानक, विचित्र उकडताय कोंडल्यासारखं.. जीवघेण..

कापून काढा डोंगरच्या डोंगर..
अजून करा बेसुमार वृक्षतोड..
चालवा २४ तास वाहने, मोटारी आणि ट्रक
आणि सतत सोडा हवेमध्ये विष..!

निसर्गाचा समतोल जेवढा ढाळता येईल
तेवढा ढाळू आपण सर्वजण.. अगदी कसोशीने..!

२६ जुलैच्या महाप्रलायातून काहीच नको शिकूया..
केदारेश्वरकडून काहीच नको शिकूया..
माळीण गावाकडून काहीच नको शिकूया..

-- (मुक्तछंद कवी) तात्या अभ्यंकर..

No comments: